शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अविनाश अनेराये असं या ई मेल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून संबंधीत शेतकरी नांदेड येथील नायगाव तालुक्यातील शेळगांव याठिकाणी राहत आहे.
कोरोना,अतिवृष्टी यामुळं आर्थिक उत्पन्न घटलं असून त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय.