जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या राज्यात उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे. या वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे (Vavadda Gram Panchayat) उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (45) (Kamlakar Atmaram Patil) यांना उष्मघातामुळे (Heatstroke) आपला जीव गमवावा लागला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः शेतात मका काढण्याचे काम सुरु केले. दिवसभर त्यांनी उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केले.
यानंतर रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना उष्माघातामुळे उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मुत्यू झाला. कमलाकर पाटील यांच्या माघारी पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे.