वसई : वसईतील नायगावमध्ये (Vasai News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्कूल बसने दोन मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
नायगाव मधील अमोल नगर परिसरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन लहान मुली रस्ता ओलांडत होत्या. त्या दरम्यान वसईच्या सेंट अगस्टिन स्कुल बसने समोरून येऊन मुलींना उडवलं आहे. लहानग्या दोन्ही मुली बसच्या समोरील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वसई पश्चिमेच्या कार्डिनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महिरा अन्सारी (वय 5 वर्ष) आणि गुलशन अन्सारी (वय 2) अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत.
बस ड्रायव्हरला समोरच्या मुलींचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांना रस्त्यावर एकट सोडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही
Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल
Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा