प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

406 0

नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस या योजनेसाठी महत्त्वाची आहे पंचायत सचिव पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटर द्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे

* सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
* आता Farmers Corner वर जा.
* येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
* यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
* या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
* यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो.

Share This News

Related Post

शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Posted by - June 26, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा…

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Posted by - June 8, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज…

पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

Posted by - September 9, 2022 0
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री,…

टीईटी घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याची जामीनावर सुटका

Posted by - May 31, 2022 0
पुणे- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा…

दिल्लीच्या महापालिकेवर आपचा झेंडा; “सगळ्यांच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करणार…!” – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Posted by - December 7, 2022 0
दिल्ली : दिल्ली महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यात ‘आप’ला यश मिळाले आहे. 250 पैकी 240 जागांचे निकाल लागले असून 134 जागांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *