पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये (Pune Porsche Accident) आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये त्या अल्पवयीन मुलाचे वडील राहुल अग्रवाल आणि या मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालत आरोपींवर कठोर कारवाई करावी असे आदेश पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक पोस्ट करत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
काय केला खुलासा?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत या प्रकरणात कार अपघातासाठी दोषी असलेला मुलगा हा आपल्या मुलाच्या शाळेतच होता असं म्हटलं आहे. या मुलाच्या ग्रुपमधील काही मुलांनी प्राजक्त तनपुरेंच्या मुलालाही शाळेत असताना त्रास दिला होता, असा दावा सोनाली यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा त्रास एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की अखेर आम्ही मुलाची शाळा बदलली, असंही सोनाली तनपुरेंनी म्हटलं आहे.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.#justicefor_anishashwini
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
नेमके काय लिहिले पोस्टमध्ये?
“कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही,” असं सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे. तसेच पुढे सोनाली यांनी, “शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता,” असंही म्हटलं आहे. “त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा,” असं सोनाली तनपुरे यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर