पुणे : भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या. घटनेची चौकट बदलण्याचे आणि मोडतोड करण्याचे काम माजी पंतप्रधान पंडीत नेहरुंपासून इंदिरा गांधी यांनी केले असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी रविवारी केला. महायुतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, शाम सातपुते, पुष्कर तुळजापुरकर यावेळी उपस्थित होेते.
भारतीय जनता पक्ष राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसनेच मुळात घटनेची चौकट बदलली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारले. गेल्या 74 वर्षांमध्ये 105 वेळा घटनेमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 56 वर्षे सत्तेत असणार्या काँग्रेसच्या काळात सर्वाधिक 75 वेळा घटनादुरुस्ती झाली. यापैकी पंडीत नेहरुंच्या काळात 17, इंदिरा गांधी यांच्या काळात 29, राजीव गांधी यांच्या काळात 10 अशा एकंदर 56 घटना दुरुस्त्या नेहरु गांधीच्या परिवाराच्या काळात झाल्या.
माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात 10 आणि मनमोहन सिंग यांच्या काळात 6 घटना दुरुस्ती झाल्या असल्याचे भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात बहुतेक घटना दुरुस्त्या वेगवगेवळ्या सामाजिक आरक्षणाची व्याप्ती किंवा काळ मर्यादा वाढवणार्या होत्या. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देणारी 86 वी दुरुस्ती आणि केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या नियंत्रित करणारी 91 वी दुरुस्ती अशा दोन महत्वपूर्ण व दुरगामी परिणाम करणार्या घटनादुरुस्त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्या. शिक्षणाच्या अधिकारामुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार व्हायला गती मिळाली. मंत्र्यांच्या संख्येवर निर्बंध घातल्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार काही प्रमाणात तरी अटोपशीर झाला असल्याचे भंडारी म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : मुरलीधर मोहोळ
Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका
Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
Gujarat News : गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; 14 पाकिस्तानी ड्रग्स तस्करांना अटक
Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम
Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?
Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश
Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात
Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात