सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून महिलांची मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांच लग्नाचे वचन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अपहार करायचा.भवरकुवा पोलिसांनी दिल्लीतून आरोपीला ताब्यात घेतला आहे.
असा झाला उलगडा…
भवरकुवा पोलीस स्टेशन चौकशी अधिकारी आनंद राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील रहिवाशी श्रीनिवास राव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी बेपत्ता झाली, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, महिलेच्या खात्यातून दिल्लीला पैसे पाठवण्यात आले असून त्यानंतर मोबाईल लोकेशन पोलिसांनी शोधायला सुरुवात केली.
बेपत्ता झालेल्या महिलेशी बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहसीन असल्याचे समजले. त्यानंतर या मोहसीनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आत्तापर्यंत या आरोपीने अनेक महिलांना लग्नाचं आश्वासन देऊन लाखो रुपयांना गंडा घातल्याच त्यानी मान्य केले. अधिक तपास भवरकुवा पोलीस करत आहेत.