हिवाळ्यात गरम गोष्टी हव्याशा वाटतात. कारण या ऋतूत गरम पदार्थ प्यायल्याने शरीरात उष्णता येते. हिवाळ्यात, लोक मुख्यतः आल्याचा (Ginger) चहा किंवा त्याचा काढा पितात. आल्याचा स्वभाव उष्ण असल्याने त्याचे सेवन केल्याने थंडीचा त्रास कमी होतो. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक खूप वाईट असतो. आल्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अद्रकाच्या अतिसेवनामुळे शरीरात होणा-या काही समस्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात…
1) रक्त गोठण्यावर परिणाम होतो
आल्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात.पण त्याचे जास्त सेवन रक्त गोठण्यास प्रभावित करू शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात.
2) तोंडात जळजळ होणे
जर तुम्ही जास्त प्रमाणात आले खात असाल तर ही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे आल्याचा वापर शक्य तितक्या मर्यादित प्रमाणात करा.
3) पोटात जळजळ होणे
आले शरीराला ऊब देत असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ, अॅसिड तयार होणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, खाल्ल्यानंतर याचे कमी प्रमाणात सेवन केल्यास पोट फुगण्याची समस्या कमी होऊ शकते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू