एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच, विलीनीकरणाचा मुद्दा राज्य सरकारने काढला निकाली

182 0

मुंबई- राज्य सरकारने एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात आला होता. अहवाल सभागृहात ठेवल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शुक्रवारी या अहवाल संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सभागृहात निवेदन करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेकडो कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू होती.

याबाबत त्रिसदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी! माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Posted by - July 16, 2022 0
मुंबई: शिवसेनेतील बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर…
Pune News

Pune News : पुण्यात दहशतवादी-पोलीस यांच्यातील झटापटीचा थरारक VIDEO आला समोर

Posted by - August 4, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होत दहशवाद्यांना पकडले होते. हे दहशतवादी पुण्यात मोठा घातपात करण्याच्या तयारीत…

#PUNE : कसबा पोट निवडणुकीचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; हेमंत रासनेनकडून आचार संहितेचा भंग ?

Posted by - February 27, 2023 0
पुणे : काल २६ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. या पोट निवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी…

सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी…
CM EKNATH SHINDE

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Posted by - April 5, 2023 0
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली असून सततचा पाऊस आता नैसर्गिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *