बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतावर काय होणार परिणाम?

3000 0

ढाका (बांगलादेश): भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला या संघर्षानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसीना या सध्या भारतामध्ये असून त्या लंडनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलं?

गेल्या महिन्यात, बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पोलीस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट सुरू आहे. या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संघर्षातून शंभरहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शेख हसीनांच्या राजीनाम्याचा भारतावर परिणाम काय? 

बांगलादेशात राजकी अस्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय आयात-निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आता बांगलादेशात राजनीतिक संकट उभे ठाकल्याने त्याचे मोठे नुकसान हे व्यापारिकदृष्ट्या भारताला सोसावे लागणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!