पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आमदारांचे कान टोचले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई (Yashwantrao Chavan Centre, Mumbai) या ठिकाणी ही बैठक पार पडली. या बैठीकीमध्ये शरद पवार यांनी राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच पक्षाच्या काही बड्या नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या… pic.twitter.com/mx1PNrWQpR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 17, 2023
कोणत्या नेत्यावर सोपवली जबाबदारी
नागपूर विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्या कडे देण्यात आली आहे.
तर नाशिक अहमदनगरसह मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
पुणे विभागाची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये अशोक पवार तर खानदेशची जबाबदारी एकनाथ खडसे आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कोकण विभागाची जबाबदारी अनिकेत तटकरे आणि शेखर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.
ठाणे पालघरची धुरा जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.