जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आल्याने एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना जळगावमधील (Jalgaon News) शिरसोली या ठिकाणी घडली आहे. परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आकाश भिमराव बारी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
काय घडले नेमके?
एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश भिमराव बारी (वय-25) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. गुरुवारी रोजी एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली. या अपयशामुळे नैराशातून आकाशने रात्री त्याच्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाशने उचललेल्या या टोकाच्या निर्णयाने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यातील वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा
Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर
Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग
Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल