हिंगोली : हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची (Hingoli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अपघातग्रस्त कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरहून उमरखेडच्या दिशेने जात असताना कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.अनिरुद्ध तानाजी वानखेडे आणि अर्चना सुभाष वानखेडे अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील खरूज येथील वानखेडे कुटुंबिय छत्रपती संभाजी नगरहून दवाखान्यातून परत येत असताना हा भीषण अपघात झाला.
तसेच सुभाष रामराव वानखेडे, संतोष कैलास वानखेडे, अनंता गंगाराम चव्हाण असे या अपघातात जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. भरधाव वेगात झाडाला धडकल्याने कारचं मोठं नुकसान झालं आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध
Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत
Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली
Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा