जळगाव : राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र किंवा शत्रूं नसतो असा प्रत्यय सद्या जळगावच्या (Jalgaon News) राजकारणात येतांना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील या जिल्हातील दोन मातब्बर नेत्यांमधील चार वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. तब्बल चार वर्षांच्या कोर्ट कचेऱ्यानंतर हा वाद मिटल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रू नुकसानीच्या दावा ठोकला होता. त्याचा आज समेट झाला आहे.दोन्ही नेत्यांकडून गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचं त्यांच्या पक्षकारांचे म्हणणं आहे. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे खटला मागे घ्यावा अशी कोर्टाला विनंती करण्यात आली. त्यांची ती विनंती आपण मान्य केल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. यावेळी कोर्टात दोन्ही नेते उपस्थित होते.
Court Summons : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सन्मस. 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
काय आहे प्रकरण?
2016 साली एकनाथ खडसे मंत्री असताना विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर 161 कोटींचे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नव्हते. गुलाबराव पाटीलांनी आपल्यावर तथ्यहिन आरोप केले त्यामुळे आपली समाजात प्रतिमा मालिन झाल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटीलांच्या विरोधात जळगाव न्यायालयात 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
हा खटला गैरसमजूतीतून दाखल
गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे कृषी मंत्री असताना शेतात पॉलिहाऊस त्याच्यासह 161 कोटींचा मुक्ताईनगर सुधगिरणीच्या माध्यमातून अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. हा खटला तब्बल चार वर्षे सुरु होता. अखेर दोन्ही पक्षकारांनी गैर समजुतीतून हा खटला न्यायालयात दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने हा खटला निकाली काढला.