KCR Vs Eknath Shinde

KCR : खाजगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का नाही? के.चंद्रशेखर राव यांचा शिंदे सरकारला सवाल

910 0

पंढरपूर : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सोमवारी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज के चंद्रशेखर राव (KCR) यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी आयोजित सभेला संबोधित केले.

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

के चंद्रशेखर राव (KCR) म्हणाले की, बीआरएसच्या महाराष्ट्र प्रवेशाने राजकीय पक्ष घाबरले आहेत. तेलंगणामध्ये आम्ही ज्याप्रकारे विकास केला आहे , त्याच प्रकारचा विकास महाराष्ट्रात केल्यावर मी माझे महाराष्ट्रातील दौरे थांबवेल. बीआरएस कोणत्याही पक्षाची बी टीम नसून ती फक्त शेतकऱ्यांची टीम आहे. आम्ही फक्त तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरते नाही. तुम्ही महाराष्ट्रात बिआरएसचे सरकार निवडून द्या आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करून दाखवू.

Nanded Crime News : नांदेड हादरलं ! एका मोबाईलवरून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

सोलापूर आणि औरंगाबादमध्ये आठ दिवसातून एकदा पाणी येते तर विकास कसला झाला ? महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खाजगीकरण का केले ? खाजगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही? शेतकऱ्यांना विमा का नाही ? असा सवाल त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला विचारला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन राज्यात बदल घडवायला हवा. असेही के चंद्रशेखर राव म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!