ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातला (Odisha Train Accident) वेगळे वळण लागले आहे. या घटनेशी संबंधित एक सिग्नल ज्युनिअर इंजिनिअर कुटुंबासह अचानक बेपत्ता झाला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे एक पथक 19 जून रोजी बालासोर येथील त्यांचे घर सील करण्यासाठी गेले होते. पण यावेळी ज्युनिअर इंजिनिअरसह (Odisha Train Accident) त्याचे कुटुंबही घरी उपस्थित नव्हते. पण प्राथमिक माहितीनुसार सीबीआयने याआधी सिग्नल ज्युनिअर इंजिनिअरची प्राथमिक चौकशी केली आहे.
रेल्वे थांबली म्हणून खाली उतरले आणि दुसऱ्या रेल्वेखाली चिरडले, ६ जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, 16 जूनला सीबीआयच्या टीमने बालासोरला भेट दिली. त्यानंतर सीबीआयची टीम पुन्हा एकदा १९ जूनला बालासोरला गेली होती. त्यावेळी सिग्नल ज्युनिअर इंजिनिअरचे सोरो येथील अन्नपूर्णा राईस मिलजवळील भाड्याचे घर सील करण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंजिनिअरचे नाव आमिर खान असून, सीबीआयचे दोन कर्मचारी त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेत.
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली
रिपोर्टनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 18 जून रोजी 292 वर पोहोचली आहे. या रेल्वे अपघातात पश्चिम बंगालमधील आणखी एका 24 वर्षीय प्रवाशाचा कटक येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
रेल्वे बोर्डाने (Odisha Train Accident) या अपघाताच्या दोन महिने आधी एप्रिलमध्ये सर्व झोन प्रमुखांना इशारा दिला असल्याचे एक पत्र समोर आले आहे. या पत्रात जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील पाच घटनांचा उल्लेख करण्यात आला होता.ज्यामध्ये निष्काळजीपणा किंवा देखभाल केल्यानंतर तपासल्याशिवाय सिग्नल गीअर्स जोडल्या गेल्याच्या घटनांचा समावेश होता. याबाबत पत्रात झोन प्रमुखांना त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना शॉर्टकट पद्धती टाळण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले होते.