TOP NEWS MARATHI : ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार का ?

430 0

देशाच्या राजकारणात कधीकाळी एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसला मागील काही वर्षांपासून उतरती कळा लागली असून 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली . आणि त्यानंतर एक एक करत अनेक राज्यांची सत्ता काँग्रेसने गमावली. त्यानंतर नॅशनल हेराड्स प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी ईडी कडून चौकशी देखील झाली याच दरम्यान उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर झालं आणि या चिंतन शिबिरात ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर 7 सप्टेंबर पासून बहुचर्चित अशा भारत जोडो यात्रेचा शुभारंभ कन्याकुमारी येथून झाला असून 12 राज्यांतून 3570 किलोमीटर प्रवास या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी करणार आहेत

आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, राजकीय केंद्रीकरणाच्या समस्या आणि विचारधारा यांचा लढा म्हणून राहुल गांधी ही पदयात्रा करत असल्याचं काँग्रेस म्हणतंय. सकाळी 7 ते 10.30 आणि दुपारी 3.30 ते 6.30 या दोन सत्रात ही पदयात्रा असणार आहे. दररोज सरासरी 22 ते 23 किलोमीटर इतके अंतर ही पदयात्रा चालणार आहे. विशेष म्हणजे या पदयात्रे दरम्यान राहुल गांधी पुढील 150 दिवस कंटेनरमध्ये झोपणार आहेत. काही कंटेनरमध्ये स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनरही बसवण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान विविध भागांतील बदलतं तापमान आणि वातावरणातील फरक लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आलीये. अशा प्रकारचे सुमारे 60 कंटेनर तयार करण्यात आले आहेत. राहुल गांधी कोणत्याही हॉटेलमध्ये राहणार नाहीत,तंबूतच राहून पक्षाच्या नेत्यांसोबत ते भोजन करणार असून सर्व नेते मिळून हे भोजन तयार करणार आहेत.

या यात्रेच्या दरम्यानच हरियाणा आणि गुजरात या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका असून या राज्यांमध्ये यामध्ये काँग्रेस समाधानकारक कामगिरी करणार का आणि या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून 2024 ला काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

– संकेत देशपांडे
रिपोर्टर, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!