आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर अनेक वेळा हातामध्ये तीर्थ घेतो कित्येक जणांनी केवळ आपल्या वडीलधाऱ्यांचे पाहून हातात तीर्थ घेतल्यानंतर ते प्राशन करून त्यानंतर डोळ्याला आणि मस्तकी लावण्यास सुरुवात केली असेल पण तुम्हाला त्यामागे काय कारण आहे माहित आहे का ?
देवाचे तीर्थ हे पवित्र असल्याने ते शिरोधार्य आहे. म्हणून मस्तकाला लावले जाते तीर्थ मस्तकाला लावावे असे शास्त्रही सांगते. डोळ्याला तीर्थ लावावे असे शास्त्र नाही. तो केवळ भाविक पणा आहे. बहुतेक जड तीर्थ हातात घेतात खरंतर तीर्थ भांड्यात किंवा द्रोणात घेऊन मस्तकाला लावून मग प्राशन करावे असे शास्त्र सांगते.
संदर्भ : चातुर्मास