…तर नवं सरकार अवैध ठरेल ; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; वाचा आज काय घडले ?

942 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनवाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली असून , आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनीही ठाकरे गटासाठी युक्तिवाद केला. या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला आहे. सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.

राज्यपालांचेही राजकीय लागेबांधे असतात, याकडेही अभिषेक मनु संघवींनी घटनापीठाचं लक्ष वेधलंय. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, असं थेट बोट दाखवणारा युक्तिवाद अभिषेक मनु संघवींनी केला आहे. घटनापीठाचे कामकाज आज दुपारी तीन वाजेपर्यंत चालले आहे. आज एक तास आधीच युक्तिवाद संपला आहे. शिंदे गटाचे युक्तिवाद आणि ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे.

सिब्बल म्हणाले कि, राज्यघटनेने दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेसंदर्भात निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा असतो. राज्यपालांना कायद्यानुसार शिवसेना कोण हे ठरवण्याचा अधिकार नाही. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. शिवसेनेचे अध्यक्ष तर उद्धव ठाकरे होते मग राज्यपालांनी कोणत्या अधिकारानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. यावेळी विधानसभा नव्याने निवडून आलेली नव्हती तर आधीच आस्तित्वात असलेली होती. त्यामुळे राज्यपालांचे अधिकार काय हेही ठरवावे लागेल.

सिब्बलांनी गोगावलेंच्या प्रतोद म्हणून नियुक्तीवरही देखील आक्षेप नोंदवला आहे. आसाममधून प्रतोदाची नियुक्ती कशी होऊ शकते? असा सवाल सिब्बल यांनी केला. तर गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक रद्द करत त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेल्या नोटिसाही रद्द कराव्या, असेही सिब्बल म्हणाले.

जर एखाद्या सरकारविरोधात अविश्वास ठराव संमत झाला तर सरकार पडतं. मग राज्यपालांचे अधिकार वापरले जाऊ शकतात. मात्र राज्यपालांना सरकार पाडता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यपालांकडे गेले तेव्हा राज्यपालांनी आम्हाला (महाविकास आघाडीला) विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितलं. त्यांचा यात अधिकार काय? राज्यपालांनी घटनात्मक नैतिकता पाळायला हवी होती. तुम्ही एकदा राज्यपालांचे अधिकार ठरवले तर इतर काही ठरवायला उरतच नाही, असे देखील सिब्बल म्हणाले.

Share This News

Related Post

Pune

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मेला पुण्यात होणार संपन्न

Posted by - May 16, 2023 0
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे दि 25 मे ते 28 मे या दिवसात महर्षी…

लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022 0
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोन  टॅपिंगप्रकरणीप्र यांना आलेल्या नोटिशीवर नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं…
Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

Posted by - May 17, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद…
Dr joshi

DRDO च्या संचालकपदी डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती

Posted by - June 1, 2023 0
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ (DRDO) दिघे येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालक पदी…
nashik loksabha

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Posted by - April 28, 2024 0
नाशिक : लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या लोकसभेत राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *