अहमदनगर , (टाकळी काझी) : अहमदनगर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने राज्यातील ग्रामीण भागाला मिळणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अहमदनगर मधील टाकळी काझी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच एका महिलेची प्रसूती करण्याची वेळ आली आहे. या घटनेने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे रात्री दोन ते पहाटे चार या वेळेमध्ये बंद ठेवले जाते . या रुग्णालयाचे गेट बंद असल्याकारणाने आणि महिलेला तीव्र प्रसूती कळा सुरू असल्याने , या महिलेची गेटवरच प्रसूती करण्याची वेळ आली आहे.
सुदैवानं या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे समजते . परंतु आरोग्य सेविका किंवा डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने या ग्रामस्थांवर संकट देखील ओढाउ शकते.