Maharashtra Political Crisis : “शिंदे गटाकडे विलीनीकरण हाच पर्याय ” शिवसेनेचे वकील सिंघवी यांचा कोर्टात दावा

300 0

सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारी पाठ सुरू आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन्हीही बाजूचे वकील जबरदस्त युक्तिवाद करून एकमेकांच्या मुद्द्यांना चुकीचा ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

शिवसेनेचे वकील अभिषेक सिंघवी यांनी कोर्टामध्ये “शिंदे गटाकडे विलीनीकरण हा एकमेव बचावाचा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे त्यावर ते दावा करत नाहीत .पक्षांतर बंदी कायदा डोक्यावर घेतला जातो आहे .”असा युक्तिवाद करून “सर्व बंडखोर अपात्र ठरले तर सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील “. असे देखील स्पष्ट म्हटले आहे.

त्यासह शिंदे गट हाच खरा पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करून सगळी प्रक्रिया ही कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपणच समोर शिवसेना असल्याचा दावा केला आहे . त्यासह सर्व गोष्टी कायदेशीर करण्याचाही ते प्रयत्न करत आहेत . महाराष्ट्र सरकार चालवणे हाच गेम प्लॅन नाही तर निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून वर्तमान कार्यवाही विलंबाने करण्याचा प्रयत्न सुरू आहे . असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केला आहे.

सभापतींच्या कार्यप्रणालीवर देखील सिंघवी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत . यावेळी ते म्हणाले की, ” 21 जून पासून प्रलंबित असलेल्या आमच्या तक्रारींवर सभापतींनी कोणतीही हालचाल केली नाही ,तथापि शिंदे गटाने केलेल्या तक्रारींवर लगेचच कारवाई करण्यात येते ” हा मुद्दा त्यांनी कोर्टासमोर मांडला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!