महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उच्चस्तरीय समीती गठीत; 14 सदस्य असलेल्या समितीत मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा समावेश

460 0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्‍य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा यात समावेश आहे. समितीचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.

यात इतर अकरा सदस्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील,सुरेश खाडे, दीपक केसरकर,शंभूराज देसाई, रविंद्र चव्हाण, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी या उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीची बैठक येत्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

या समितीची ही पहिलीच बैठक होत असून कर्नाटकातील मराठी भाषिक हे या बैठकी कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!