“विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू आहे…! माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून…” अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप !

551 0

मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. चर्चेला उधाण आलेले असताना अशोक चव्हाण पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, “आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसेच विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू आहे.” असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

त्याचवेळी संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. लोकांची मने जिंकता येत नाहीत म्हणून हा प्रयत्न चालू आहे. असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, “एक पत्र माझ्या हातात आलं. त्यात मूळ सहीचं बनावट लेटरपॅड वापरलं गेलंय. त्यावर मराठा समाजाच्या विरोधात मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.जणूकाही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी माझी भावना असल्याचं त्या मजकुरात नमूद करण्यात आलं होतं.”

ते पुढे म्हणाले की, “माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून त्या पत्राचा राजकीय फायदा उचलण्यासाठीचा खटाटोप हा त्यातला मुख्य मुद्दा आहे.” असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!