पिंपरी-चिंचवड : महापारेषणच्या ढिसाळ कारभाराचा फटका पीएमआरडीए हद्दीतील उद्योगधंद्यांना बसतो आहे. खंडीत विद्युत पुरवठा, विद्युत लाईन आणि उपकेंद्राच काम अतीशय संथ गतीने चालल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. या शहराभोवती असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण आणि औद्योगीकरण झालं. मात्र या भागामध्ये पुरेशा आधारभूत सोयी सुविधा नसल्याने उद्योगधंद्यांना मोठा फटका बसत आहे. महापारेषणच्या वतीने पीएमआरडीए हद्दीत काही ठिकाणी अतिउच्च दाबाचा टॉवर तसेच उपकेंद्र उभारण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये वारंवार खंडित विद्युत पुरवठा होत आहे. महापारेषणकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आमच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही असा आरोप इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केला आहे.