जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जपान, ब्राझील या देशांमध्ये कोरोनान अक्षरशः तांडव सुरू केला आहे. कोरोना सक्रिय आकडा प्रचंड वाढत असताना मृतांचा देखील खच पडत आहे. अशातच आता भारत सरकार देखील सतर्क झाले आहे. प्रत्येक राज्याला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारत देशामध्ये सध्या 3397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
अर्थात ही पुन्हा एकदा जगभराला धोक्याची घंटा मानली जाते आहे. दोन वर्ष संपूर्ण जगाला लॉकडाऊन, मृत्यू असे भयावह दिवस पाहिले असताना आता पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव होऊ नये याचीच लोक धास्ती घेत आहेत. अर्थात पूर्ण एकदा योग्य ती काळजी केवळ घेणं आवश्यक आहे. सध्या भारतामध्ये 3397 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत असून भारतातही ओमायक्रोनच्या BF 7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढळल्याने प्रशासन आता सतर्क झाल आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आलया आहेत. काही राज्यांनी मास्क सक्ती देखील लागू केली आहे.
भारतामध्ये सध्या 3397 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले असून 24 तासांमध्ये सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आता मृतांचा एकूण आकडा 5,30,690 वर पोहोचला आहे.