मुंबई : मंत्रीपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही. मंत्रिपदासाठी बच्चू कडू मरमर करतात असा काही विषय नाही. पण मंत्रिपद मिळावं ही इच्छा आहे. नाही मिळालं तरी बच्चू कडू काही अस्वस्थ होणार नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. शिंदे मजबूत आहेत. खमके आहेत. दिलदार आहेत. ते दिलेला शब्द कधी पाडत नाहीत. वर्षावर रात्री 3 वाजता गेलं तरी ते असतात. भेटतात. हा आधार आहे. शिंदेंबद्दल जनतेला आधार मिळत असतो, पहा काय म्हणाले आमदार बच्चू कडू…
