गृहिणींसाठी भाजी बनवताना अधिक वेळ घेणारा पदार्थ असतो तो म्हणजे मसाला…वाटण बनवा, भाज्या चिरा बराच वेळ जातो बरोबर ना? अनेक गृहिणी विशेषतः वर्किंग वूमन बाजारातून चिरलेल्या भाज्या आणणे किंवा रात्रीच भाज्या चिरून ठेवणे असे पर्याय शोधतात. पण आज तुम्हाला असा मसाला सांगणार आहे ज्यामुळे भरल्या भाज्या किंवा फळभाज्या बनवताना तुमचा अर्धा वेळ नक्की वाचणार आहे. आणि चवीबरोबर तर नो कॉम्परमाइज…
चला तर मग पाहुयात खास मसाला रेसिपी…
यासाठी सर्वात प्रथम एक पण गॅस वर ठेवा. पण गरम झाला कि यामध्ये २ मोठे चमचे अख्खे धने घाला. तसेच १ चमचा जिरे घाला. हे २ जिन्नस सुगंध येईपर्यंत हलके भाजून घ्या. ओव्हर कुक नकोच.
आता हे एका परातीमध्ये काढून घ्या. याच पण मध्ये आता २ मोठे चमचे तेल घ्या. तेल तापले कि त्यात १ पूर्ण लसूण पाकळ्या घाला. हलका रंग बदलला कि शेंगदाणे १ वाटी घाला, त्यातच अर्धी वाटी डाळं घाला. ३ ते ४ मिनिटे परता. आता पण मध्येच दाणे आणि लसूण एका बाजून करून त्यात किसलेले खोबरे घालून पुन्हा ३ ते ४ मिनिटे परता.
आता मिक्सर मध्ये सर्वप्रथम धने आणि जिरे बारीक दळून घ्या. यात दाणे, लसूण, खोबरे, डाळं यांचे मिश्रण घालून ओबडधोबड बारीक करून घ्या. जास्त बारीक करू नका. आता यात १ मोठा चमचा गरम मसाला,१ छोटा चमचा गोड मसाला, १ मोठा चमचा कांदे लसूण, १ छोटा चमचा मीठ आणि १ छोटा चमचा लाल तिखट घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्या. मिश्रण एका हवाबंद डब्यात चांगले हलवून भरून ठेवा. फ्रिज मध्ये ठेवण्याची गरज नाही. हा मसाला १ महिना सहज टिकतो. भरल्या भाज्या आणि फळभाज्यांना चॅन चव आणि बाइंडिंग येते.