सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची – सत्र न्यायधीश संजय देशमुख

322 0

पुणे- लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर, न्यायधीश वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, “लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. भविष्याचा विचार करून कोर्टात वेळ व पैसा न घालवता वाद सामंजस्याने मिटवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा आपले अग्रेसर स्थान कायम ठेवेल” असेही ते म्हणाले.

नांदेडकर म्हणाले, “लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गतवर्षी लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने देशात यश मिळवले. आजच्या लोक अदालतीच्या यशाचीही नोंद होईल. आजच्या लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे” असे आवाहनही त्यांनी केले.

सावंत म्हणाले, “लोक अदालतीमध्ये पुणे येथील ५० हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व २ लाखापेक्षा अधिक, ई-चलन ११ लाखापेक्षा अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात ६० पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ७ ते ११ मार्च या कालावधीत छोट्या गुन्ह्यातील १७ हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा लोक अदालतीची दखल जागतिक बँकेने व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने घेतली असून याबाबत एकत्रित अभ्यास करून डाटा संकलनाचे काम सुरू आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी याबाबतचे काम करत आहेत”

 

Share This News

Related Post

डॉ. श्रीकांत केळकर यांचा सुश्रुत पुरस्काराने गौरव

Posted by - April 13, 2022 0
पुणे – राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘सुश्रुत…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - July 20, 2022 0
पुणे : महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झालं होतं. मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने व राज्यातील तमाम…
Madan Das Devi

RSS चे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार ! कोण होते मदन दास देवी?

Posted by - July 25, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे वयाच्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

Posted by - February 27, 2022 0
लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *