मुंबई: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा विधान केला आहे.
चव्हाणांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जर सत्तांतर झालं तर केंद्रातील एनडीए सरकार कोसळेल चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे आपला पाठिंबा काढून घेतील असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.