nilesh rane

पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद; निलेश राणेंची टीका

956 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. या निर्णयांमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) दिलास मिळाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर केंद्रीय मंत्री निलेश यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुमची तुमच्या सल्लागारांनी वाट लावली. चांगली लोकं तुम्हाला चालत नाही म्हणून तुमची ही अवस्था. पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद झाली अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात 15 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरतला गेले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर शिंदे यांना आणखी 24 आमदार येऊन मिळाले होते. यानंतर 10 अपक्षांनी देखील पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला होता. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना भेटून सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले. त्यानंतर कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदेनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!