मुंबई : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये राजकीय इच्छाशक्ती दाखवून पाकिस्तान(PAK)चे दोन तुकडे केले. त्यावेळी युद्ध करण्याचा निर्णय इंदिराजींचाच होता. मात्र, आता युद्ध करायचे की नाही, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर सोडला आहे, अशा शब्दात शिवसेना, उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERY) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
https://www.youtube.com/live/vHtUGnrZecc?si=eXL1cKB2ShLHlK-c
ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानबाबत निर्णय घेताना पंतप्रधान मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी होती. मोदी पाकला धडा शिकवण्याची भाषा सातत्याने करतात. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा आक्रमक आहेत, पण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही भारतीय सैन्याला मोकळीक दिली. घरात घुसून मारायचे की नाही, हे अजून ठरत नाही.
बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी २०-२२ वर्षांचे असतील. आता ते ७५ वर्षांचे असून राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. मोदी जाता जाता उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला. त्यासाठी तुरुंगात गेल्याचाही खुलासा खुद्द मोदी यांनी
केलेला आहे.
म्हणजे, प्रत्यक्ष युद्धभूमीवरचा आणि भूमिगत राहून कार्य करण्याचा अनुभव मोदी यांना आहे. पाकबरोबरच्या युद्धात त्यांचा हा अनुभव कामी येईल, असा खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे. दिल्लीत सातत्याने बैठका सुरू आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. यावरून काश्मीर पूर्णपणे सुरक्षित आणि दहशतवादमुक्त झाल्याचा सरकारचा दावा खोटा होता, हे दिसून आल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
Top News Informative : राजकीय नेत्यांना घाम फोडणारी ‘ईडी’ नक्की आहे काय ?
#INFORMATIVE : वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय ? नॉमिनी आणि वारसदारातील फरक,जाणून घ्या हि माहिती
KOYTA GANG PUNE: पुण्यात गुन्हा करून कोयता गॅंगने गाठलं मस्साजोग
Rohit Gera Case: रोहित गेरा प्रकरणातील तक्रारदाराची पोलीस संरक्षणाची मागणी