मुंबई : ठाकरे गटाच्या प्रचार गीताचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. मात्र हा अर्ज आता राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने ठाकरे गटाचा हा फेरविचार अर्ज फेटाळला आहे.
निवडणूक आयोगाने 24 एप्रिल 2023 रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गितासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील जय भवानी शब्द वगळा असे या नोटीसमध्ये म्हंटले होते. मात्र ठाकरे गटाने यावरून आक्रमक भूमिका घेतली. प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नाही असं म्हटलं आहे.
आपल्या मतावर ठाम राहत ठाकरे गटाकडून फेरविचार अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज देखील आता निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा
Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग