मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. यानंतर दोन्ही गटांकडून आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
“2017 साली मला आणि अजित पवारांना सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. परंतु, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. सात-आठ महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा, खाती, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदेही ठरली होती. पण, काही कारणास्तव ते सरकार बनलं नाही. नाहीतर 2017 साली भाजपा आणि राष्ट्रवादीचं स्थापन झालं असते.” असे मोठे विधान सुनील तटकरे यांनी केले आहे.
तसेच त्यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भातदेखील वक्तव्य केले आहे. “2019 साली पहाटेचा नाहीतर सकाळी 8 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण, तेव्हा अजित पवारांच्या कार्यालयात बैठक पार पडली.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलं होतं. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठाण्यातील आमदाराचींही सही होती,” असे म्हणत सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना यावेळी टोला लगावला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा
Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल
Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात
Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले