मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यांनतर अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. याबैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणले की आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यावेळी 9 मंत्री उपस्थित होते.
Ajit Pawar : अजित पवारांच्या एंट्रीमुळे आता पुण्याचा पालकमंत्री बदलणार ?
Saisha Bhoir : साईशा भोईरने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका; ‘ही’ बालकलाकार करणार रिप्लेस
आम्ही आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे निर्णय घेतले. आम्हाला सरकारमध्ये अडीच वर्षाचा अनुभव असून, मध्यतंरी फक्त एक वर्षाचा गॅप पडला होता. यापूर्वी मी (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर भाजपच्या इतर नेत्यांबरोबर आम्ही काम केले आहे. आम्ही समान विकासाच्या मुद्यावर एकत्र आलो आहोत.देश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जात असून देशाला नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही असेही पवार म्हणाले.