मुंबई : महायुती सरकार स्थापन झाल्यापासून सर्व 48विभागांनी पहिल्या 100 दिवसांत घेतलेले निर्णय, धोरणांचा आढावा घेण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमात निश्चित 902 उद्दिष्टांपैकी 706 म्हणजे, 78 टक्के उद्दिष्ट्ये साध्य झाली आहेत, उर्वरित १९६ उद्दिष्ट्ये देखील लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी “एक्स” या सोशल मीडियावर पोस्ट करून 100दिवसांच्या आढावा कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली आहे. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100 टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत तर आणखी 18 विभागांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.
राज्यसरकारने हाती घेतलेली नवीन धोरणे व लोकाभिमुख निर्णयांची माहिती आणि दूरगामी परिणाम जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला आहे.
POLITICAL SPECIAL: विनेश फोगाट बजरंग पुनियानं काँग्रेस प्रवेशानं काँग्रेसला काय होऊ शकतात फायदे
BJP STATE GOVERNMENT: महाराष्ट्रासह या राज्यात आहेत भाजपाचे मुख्यमंत्री
TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं