1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या जवळ पोहोचले आहे. अशावेळी उष्माघाताचा त्रास होतो. त्यातून डोकेदुखी मळमळ उलटी असा त्रास होतो.
2) सनबर्न – भर उन्हात तुम्ही फिरत असाल काम करत असाल तर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे सनबर्न होण्याचा धोका असतो. त्यातून त्वचेवर लाल चट्टे दिसतात मळमळ आणि उलटी होते.
3) घामोळे – उन्हाळ्यात घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर पडतो पण अडथळ्यांमुळे त्वचेवर घामोळे येतात. त्याला खाज सुटते मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
4) बुरशीजन्य आजार – घट्ट कपडे घातल्याने घाम तसाच राहतो त्यामुळे बुरशीजन्य आजाराची शक्यता असते.
5) टायफॉईड -उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी घटते अशावेळी दूषित पाणी आणि अन्नपदार्थ आहारात आल्यास त्यातून टायफॉईड होण्याची शक्यता असते.