Cough Syrup

Cough Syrup : खोकल्याचं औषधं ठरत आहे मृत्यूचे कारण ! 7 भारतीय कफ सिरप कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये

1329 0

खोकला झाला की आपण कफ सिरप (Cough Syrup) घेतो मात्र हेच कफ सिरप तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं. आफ्रिकन देश गांबियासह जगभरातील 300 लोकांच्या मृत्यूला जबाबदार धरून जागतिक आरोग्य संघटनेनं सात भारतीय कफ सिरप (Cough Syrup) तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली आहॆ. त्यामुळं भारताच्या औषध निर्माण करणाऱ्या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता? WHO कडुन सावधान राहण्याचा इशारा

गेल्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये दूषित कफ सिरपमुळं 300 मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. कफ सिरपव्यतिरिक्त WHO ने व्हीटॅमिन बनवणाऱ्या कंपन्यांची ही तपासणी केली आहे. याविषयी कफ सिरपच्या विक्री बाबत आत्तापर्यंत 9 देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषध कधीही सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखमीवर आधारित विश्लेषण केले जात आहे. भारत औषधांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करणार नाही. बनावट औषधांमुळं कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही सदैव सतर्क असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले आहेत.

#PUNE : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर तरुणाचा अंत विजेचा धक्का लागून नाही ! महावितरण अहवालानुसार …

गांबिया ,उझबेकिस्तान सह भारतातील कफ सिरपमुळं (Cough Syrup) कॅमेरुनमध्येही 12 मुलांचा म्रुत्यु झाल्याचे समोर आले आहे. हे कफ सिरप इंदूर येथील कंपनीकडून तयार केले जाते. एका एजन्सिच्या अधिकाऱ्याने सांगितलं की या कंपन्यांच्या औषधांमध्ये डायथीलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. चार कफ सिरिपच्या विरोधात अलर्ट जारी करण्यात आला असून गांबियातील 66 मुलांची किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. WHO भारत आणि इंडोनेशियामध्ये कफ सिरप आणि व्हीटॅमीन बनवणाऱ्या 20 कंपन्यांची सध्या चौकशी करत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!