मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा (Weather Update) फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनुसार राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नुसता पाऊसच पडणार नसून हवामान विभागाकडून वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किमी वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे. एकीकडे जोरदार पावसासोबत वादळाचा इशारा तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट अश्या दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त
Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव
Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या