पुणे : हवामान विभागाकडून (Weather Update) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा,ग़डचिरोली, गोंदिया, नागूपर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.