Manoj Jarange

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

547 0

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्यांनी सरकार समोर 9 मागण्या मागितल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया…

मनोज जरांगे पाटलांच्या ‘या’ आहेत 9 मागण्या
सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अमंलबजावणी करा
हा कायदा बनण्यासाठी येणाऱ्या दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या
57 लाख नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या,त्यांच्या नातेवाईकांना शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतवर लावा
बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरु करण्यात यावीत
अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
हैद्राबाद, बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा
शिंदे समितीचे काम युद्ध पातळीवर सुरु ठेवून एक वर्षाची मुदतवाढ द्या
मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा त्याची अंमलबजावणी करा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!