जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या डेडलाईनला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 10 प्रमुख मागण्या केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत…
1 नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या.
2 नोंद सापडली पण त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन सांगा
3 नोंदीच्या आधारावर कुटुंबाला आरक्षणात घ्या
4 सर्व नातेवाईक सुद्धा आरक्षणात घेतले पाहिजे
5 रक्ताच्या सर्व नातेवाईकांना आरक्षण दिले पाहिजे
6 शिंदे समितीचे काम सतत सुरू ठेवले पाहिजे
7 ज्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी, ईडब्लूएस मार्फत शिक्षण घेतले, किमान 13 हजार पेक्षा अधिक निवडी झाल्यात पण नेमणूक नाही, तातडीनं त्यांना नियुक्ती द्यावी.
8 मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला विनंती, तोपर्यंत जर तुम्हाला नोकरभरती करायची असेल तर करा, आमची हरकत नाही पण मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवून पदं भरा.
9 सरकारला पुन्हा विनंती सरकारने नोंदी शोधाव्यात, त्यासाठी भाट लोकांकडे असलेल्या वंशावळी तापसाव्यात, देवीची लस दिली त्यावेळेच्या पण नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धराव्यात.
10 नोंदी सापडल्यानंतर लगेच प्रमाणपत्र द्या, काही ठिकाणी कक्ष बंद पडले आहेत ते पुन्हा सुरू करा.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार