नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सर्वत्र चर्चा सुरु असणारा एकमेव मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक. संपूर्ण देश आगामी निवडणुकीच्या (Indian Railways) चर्चांमध्ये रमलेला असतानाच देशातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून या निर्णयाचा फायदा नागरिकांना उपभोगता येणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना तिकीटामध्ये थेट 50 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.
रेल्वेच्या तिकीट दरातील कपात करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे. कोविड काळादरम्यान रेल्वे विभागाच्या वतीने तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला मात्र आता ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे. ज्यामुळे आता अनेकजण अर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करू शकतात.
नेमकं काय आहे प्रकरण?
सर्व रेल्वेच्या तिकीटा दरांमध्ये 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कोविड काळामध्ये गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे विभागाच्या वतीनं पॅसेंजर रेल्वे गाड्यांची विभागणी करत त्याच्या तिकीटाची रक्कम एक्स्प्रेस ट्रेन सोबत जोडण्यात आली होती. थोडक्यातच प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेसाठीही एक्स्प्रेसचं तिकीट भाडं भरावे लागत होते. दर दिवशी प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत होता. अखेर रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे पॅसेंजर रेल्वेसाठी आता Second Class चा तिकीट दर लागू करण्यात आला आहे. रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्येही बदल करण्यात आले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती
Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर
Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी