आजपासून पुन्हा शाळा सुरु, पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

107 0

मुंबई- राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

चार दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरु करण्या संधर्भात माहिती दिली होती. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पहिली ते बारावी आणि शिशू वर्ग सुरू करण्यासही मान्यता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, युरोपात कोरोनाची लाट सुरु असताना शाळा सुरु आहेत. राज्यभरातील रुग्णालयात ९० ते ९५ टक्के बेड रिकामे असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरु केल्या सल्ल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे असं आवाहन त्यांनी केलं. जालनामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्या जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या जास्त असेल अशा जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने या संबंधीचा निर्णय घ्यायचा आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचना केल्या असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Share This News

Related Post

चार्टर्ड प्लेन मधील फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांची बोलती बंद

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी आपण सुरत कशी सुटका करून घेतली, कसाबसा जीव वाचवून परत आलो, याची रंजक कहाणी बुधवारी…
Pune-PMC

Pune Election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला दिले ‘हे’ आदेश

Posted by - September 12, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकीच्या (Pune Election) अनुषंगाने मतदारयादी दुरुस्ती व अद्ययावत करण्याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त…

मोठी बातमी ! अनिल देशमुख केईएमच्या अतिदक्षता विभागात दाखल, छातीत दुखत असल्याची तक्रार

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीत दुखत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाच्या…

ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्या गौतम अदानी यांनी केल्या टेकओव्हर

Posted by - May 16, 2022 0
नाव दिल्ली- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे सिमेंट किंग होणार आहेत. त्यांच्या अदानी समुहाने देशातील दोन…

उद्धव ठाकरेंचा राजीनामा; संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार

Posted by - June 30, 2022 0
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *