नागपूर : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून त्यावरील अपघाताचे (Samruddhi Highway Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अनेकदा चालकाच्या चुकीमुळे हे अपघात होत असतात. यामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागतो. सध्या अशीच एक भीषण अपघाताची घटना आज पहाटेच्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
कसा घडला अपघात?
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. तेव्हा खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागली आणि अपघात झाला. सकाळी 5 वाजता दरम्यान हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं बाजूच्या कंटेनरला धडकली. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताप्रकरणी तळेगाव दशासर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का
Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा
Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग
Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू