Bandra Accident

Bandra Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

490 0

मुंबई : मुंबईत दिवाळीची धामधुम सुरु असताना गुरुवारी रात्री उशिरा वांद्रे (Bandra Accident) वरळी सी लिंकवरील टोल प्लाझावर मोठा अपघात झाला. सी लिंकवर काही वाहने टोलनाक्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले.

भरधाव वेगात असलेली कार वरळीहून वांद्र्याच्या दिशेने येत होती. या घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. टोल बुथवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. कारला धडकलेल्या कारचेही नुकसान होऊन ती बंद पडली. त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

वेगात येणाऱ्या कारच्या चालकाने सी लिंकवर दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर त्याने पकडले जाऊ नये म्हणून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कार चालकालाही दुखापत झाली आहे. मुंबई पोलिसांकडून अपघातग्रस्त कार जप्त करण्यात आली आहे.

हे पण वाचा
Amravati Accident News : एक डुलकी 14 जणांच्या जीवावर बेतली! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!