नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना (Bus Accident) घडली आहे. यामध्ये प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस (Bus Accident) अचानक नदीत कोसळली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. या अपघातातील जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
अपघातग्रस्त बस रांचीहून गिरिडीहच्या दिशेने जात होती. बस अचानक गिरिडीह-डुमरी रस्त्यावर आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली. यानंतर अचानक बसमध्ये आरडाओरडा झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन केला, तर स्थानिक लोक बचावकार्यासाठी पुढे सरसावले. काही प्रवाशांचा नदीत बुडून मृत्यू झाला. बसमधील अपघातानंतर अनेक प्रवासी अडकून पडले होते. काही लोक नदीत बुडाले मात्र त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सूचना मिल रही है कि रांची से गिरिडीह आ रही बाबा सम्राट बस असंतुलित होकर पीरटांड़ बराकर पुल से नीचे गिरी हैं, राहत एवं बचाव का काम जारी है , जिले के वरिष्ठ अधिकारियों को निर्देश दिया हूँ कि राहत कार्य में कोई कोताही न हो, सबके सुरक्षित होने की कामना करता हूँ!
— Banna Gupta (@BannaGupta76) August 5, 2023
दुर्घटनास्थळी सरकार आवश्यक ती कार्यवाही करत आहे. राज्य सरकार जखमींना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे झारखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी सांगितले आहे.