नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पुढील टप्प्यांमध्ये पाचव्या टप्प्यात अनेक मोठ्या मतदारसंघांसाठीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. याच पाचव्या टप्प्यामध्ये अर्थात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघांतून काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. अखेर आज काँग्रेसकडून रायबरेली, अमेठी या मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
काँग्रेसकडून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, अमेठीतून के.एल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्याच वतीनं यासंदर्भातील माहिती एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढायच्या, मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत.
शुक्रवारी राहुल गांधी शक्तिप्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत, तर के एल शर्मा अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. के.एल शर्मा यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणीं यांच्यासोबत होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप