चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून तब्बल 100 नागरिकांना विषबाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या विषबाधेमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. रामप्रेक्ष यादव असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ- उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या नागरिकांना या परिसरात असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. एकाचवेळी 100 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ! ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण
Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ
Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?