रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शालेय शिक्षणात पहिलीपासूनच कृषी विषयाचा समावेश होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. केसरकर यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठाला काही कामानिमित्त भेट दिली, त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषीचे धडे मिळणार असल्याचं मंत्री केसरकर यांनी म्हटलं आहे.
नेमके काय म्हणाले केसरकर?
भविषष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषी हा विषय शिकवला जाणार आहे. आपन म्हणतो निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषीला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय कंपलसरी करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.
कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला आहे. यंदाच्या चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी शिक्षकांना देखील प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. कारण बऱ्याचं शिक्षकांनी कृषी शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषीचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी