Sanjay Raut

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

500 0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकांविषयी जी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी घेतली आहे ती भूमिका प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत न घेतल्याने फडणवीस आणि भाजपाचं ढोंग उघड झालं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो आहोत की नवाब मलिकांविषयीची भूमिका प्रफुल्ल पटेलांबाबत का नाही? यावर सगळ्यांची तोंडं शिवली गेली आहेत, वाचा बसली आहे. नाहीतर मग सांगून टाका प्रफुल्ल पटेल महात्मा, धर्मात्मा आणि महान व्यक्ती आहेत. इक्बाल मिर्ची हा संत आहे. दाऊद इब्राहिम विश्वपुरुष हे भाजपाने, फडणवीसांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळे अशा लोकांशी व्यवहार करणं हे काय चुकीचं नाही हे स्पष्ट करा. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

कांदा प्रश्नी लवकर तोडगा निघावा
कांदा प्रश्नी तोडगा निघाला हवा. केंद्र सरकार चे काय डाव पेच आहेत ते माहिती नाही. शेतकऱ्यांना 4 पैसे काही मिळत असतील तर धोरणे मधे येतात. शरद पवार जाणकार नेते आहेत. यात राजकारण न आणता शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याची भावना समजून घेतली पाहिजे. सगळ्या जाती धर्माचा हा प्रश्न आहे. पवार साहेब उतरणार असतील तर केंद्र सरकार ने निर्णय घ्यावा असे संजय राऊत म्हणाले आहेत.

उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही – संजय राऊत
2019 मध्ये भाजप ने दिलेला शब्द पाळला नाही. भाजप सोबत सरकार बनवण्याचा तयार नाही. उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या सरकार पडलं तर उदय सामंत आमच्या दारात असतील पण आम्ही त्यांना घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना त्या सरकार मध्ये मुख्यमंत्री केले असते तर तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असती असे संजय राऊत म्हणाले आहेत.

रामदास कदम यांच्यावर टीका
भविष्यात कळेल कोण गांडू आणि कोण पळपटू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी रामदास कदम यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीबाबत मोठे विधान
महाविकास आघाडी बनत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचा विरोध होता असे संजय राऊत म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!